दर एक – दोन वर्षांनी कोणतीतरी निवडणूक येते आणि जाते….
प्रचाराचा – आरोप – प्रत्यारोपाचा धुरळा मात्र उडवते ……
आणि मतदाराला श्वसनाचा विकार देऊन जाते. 😦
आश्वासनांची खैरात करते~~~~
पण गेल्या निवडणुकीत दिलेली आश्वासने विसरूनच जाते.
निवडणुकीच्या काळात सामान्य माणसांची करमणूक होते…
जाहिरातदार, Media , इतर सेवा देणारे, सामान्य कार्यकर्ता यांना पैसा देऊन जाते.
पेरले कि उगवते.
निवडणुकीत केलेला खर्च चांगला परतावा देते.
निवडणुकीत कोणी हरतो – कोणी जिंकतो ….
पण निवडणुकीत हरुन सुद्धा विजयाचा आनंद घेता येतो …
कारण तुमच्या हरण्याने तुमचा शत्रू पण हरलेला असतो.
जिंकणारा परत हरणाऱ्या उमेदवाराशी हात मिळवणी करतो.
म्हातारपणा पर्यंत अपूर्ण राहतात ….
१३-१०-२०१४ ला वाटले एकदाचा सुटलो, 🙂
पण ४८ तासात परत अडकलो. 😦
उपाय म्हणून अंक गणिताचे पुस्तक काढले आणि
बेरीज – वजाबाकीची गणिते सोडवत राहिलो.
उत्तर बघून प्रश्न बनवीत राहिलो.
अजून ४८ तासानी उत्तर मिळेल सुद्धा
पण मनाची बेरीज परत होईल केव्हा?
तलवार – बाणांनी घायाळ मनाच्या जखमा भरतील,