जर तुम्हाला प्रगती करायची असेल / ध्येय गाठायचे असेल, तर तुम्हाला तुमच्या कंफर्ट झोन मधून बाहेर यावेच लागेल किंवा तुमचा कंफर्ट झोन मोठा करावा लागेल. तरच हे शक्य होईल. बघा विचार करून.
थर:
आयुष्यात प्रत्येक वेळी – प्रत्येक गोष्टीत कोणत्या थरापर्यंत जायचे हे ज्याला कळते, तो आयुष्यात यशस्वी व सुखी होतो. बघा विचार करून.
comment करण्याच्या अनेक पध्दती असतात. जोक हे त्यातीलच एक माध्यम, म्हणून अनेक लोक खुबीने त्याचा वापर करतात. वेळ प्रसंगी हि जोक होती, म्हणायला मोकळे.
तुमच्या घरात असलेल्या चैनी वस्तूंवर (भले त्या वापरात का नसेनात) तुमची स्टेटस अवलंबून नसते.
आयुष्याच्या परीक्षेत यशस्वी होणे जास्त महत्वाचे असते, हे ज्याला कळते त्याचे पाय जमिनीवर राहतात.
एकवाक्यता :
चांगला माणूस होण्यासाठी आपल्या बोलण्यात, वागण्यात आणि मनात एकवाक्यता असणे आवश्यक आहे.
मनातील शांतता हि भौगोलिक शांततेवर अवलंबून नसते असे माझे मत आहे. बघा विचार करून.
आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. आपल्याला स्वातंत्र्य किंवा आजादी १५-०८-१९४७ साली मिळाली. तरीसुद्धा व्यक्ती म्हणून आपण खरेच स्वतंत्र आहोत का? आपल्याला खऱ्या अर्थाने आयुष्यात आजादी मिळते का?
कृती करताना जर परिणामांची कल्पना असेल, तर माणसाच्या हातून कोणतेही वावगे कृत्य घडणार नाही.
मला किंवा त्याला सगळं कळतं, सगळं येतं आणि सगळं माहित आहे, हि वाक्ये सर्वार्थाने खरी नसतात, ह्या गोष्टीचे भान ज्याला असते त्याचे आयुष्य कधीच भरकटणार नाही.
दिसतं तसच असतं , असं दरवेळेला नसतं. 🙂
वास्तवाचे भान आणि परिस्थितीची जाणीव प्रत्येकाला नसते. वास्तव स्वीकारण्यातच शहाणपणा असतो.
लिखित शब्द हे मनातील विचार – भावना व्यक्त करण्याचे माध्यम आहे. माझ्या मते हे विचार – भावना समोरच्याला कळणे हे जास्त महत्वाचे. अर्थात शुद्धलेखनातील चुकांचे मी समर्थन करत नाही.
असत्याचे अनेक चेहरे असतात, परंतु सत्याला एकच चेहरा असतो आणि तोच खरा असतो.
सुख हे सुख असते. दोन माणसांच्या सुखाची तुलना होऊ शकत नाही. प्रत्येकासाठी त्याचे सुख भारीच असते.
नातेसंबंधात जेव्हा तुमच्या नाही म्हणण्याला काही अर्थ नसतो, परंतु समोरच्या व्यक्तीला मात्र नावापुरते का होईना तुमच्या होची अपेक्षा असते, तेव्हा तोंडापुरते हो म्हणण्यातच सर्वांचे भले असते.
ज्या माणसाला आत्मविश्वास असतो, त्याला दुसऱ्याच्या सर्टिफिकेटची गरज लागत नाही.
देवाने प्रत्येकाला त्याची आयुष्य मर्यादा जन्माबरोबर सांगितली असती तर, माणसांच्या वागणुकीत काही फरक पडला असता का?
आपल्याला आयुष्यात अनेक अनुभव येतात. काही चांगले, काही वाईट, काही आंबट – गोड, काही कडू वगैरे. हे अनुभव आपल्याला काहीतरी शिकवतात. त्यातून प्रत्येक जण नेमके किती शिकतो हा वैयक्तिक प्रश्न आहे आणि संशोधनाचा सुद्धा. असो.
काही अनुभव वेगळे (different) असतात तर काही अनुभव कठीण (difficult) असतात. वेगळे (different) अनुभव कठीण (difficult) असतीलच असे नाही. मात्र कठीण अनुभव बरेच वेळा वेगळे असतात.
आपण सर्वजण आपल्या वागणुकीचे छान समर्थन करणारे वकील असतो. त्याचवेळी दुसऱ्याच्या वर्तणुकीचा न्याय निवडा करणारे जज असतो.
माझ्या मते खऱ्या – खोट्याच्या पलीकडे सुद्धा एक दुनिया असते. नाणे फेक करून जरी निर्णय घेतला, तरी नाण्याच्या कडेप्रमाणे काहीतरी अव्यक्त सत्य उरतेच. ह्याची जर आपण जाण ठेवली तर माणसांमधील नातेसंबंध चांगले राहायला मदत होईल.
लहानपणी आपण खेळण्यांनी खेळतो. काहीवेळा पालकांसाठी आपण खेळणे असतो. नियतीच्या हातात तर आपण सर्वजण खेळणीच असतो.
मरण म्हणजे आत्म्याचे शरीराच्या पिंजऱ्यातून उडून जाणे.
‘ जग हे बंदिशाळा ‘ हे जर का मनापासून स्वीकारले आणि मनात ठसले , तर ते सुखाच्या मार्गावरील पहिले पाऊल असेल.
माणूस उदास व्हायला लागला कि समजावे ,,,, त्याला म्हातारपणाची चाहूल लागली आहे.
विसंवाद हा सुद्धा संवादाचाच प्रकार आहे.
आदर्श नवरा आणि आदर्श बायको हे एक न सुटलेले कोडे आहे. …. हौशी कौटुंबिक सल्लागार म्हणून केलेले निरीक्षण.
आपले वागणे आदर्शवत नसताना दुसऱ्याकडून मात्र आदर्श वर्तणुकीची अपेक्षा ठेवली जाते.
सुधीर वैद्य
५९२ ) स्पंदने आणि कवडसे – ३१
Published August 27, 2018 Spandane - The Art of Living , Spandane Articles Leave a CommentTags: comments, Kavadase, Life, Opinion, outlook, reflection, spandane
जर तुम्हाला प्रगती करायची असेल / ध्येय गाठायचे असेल, तर तुम्हाला तुमच्या कंफर्ट झोन मधून बाहेर यावेच लागेल किंवा तुमचा कंफर्ट झोन मोठा करावा लागेल. तरच हे शक्य होईल. बघा विचार करून.
थर:
आयुष्यात प्रत्येक वेळी – प्रत्येक गोष्टीत कोणत्या थरापर्यंत जायचे हे ज्याला कळते, तो आयुष्यात यशस्वी व सुखी होतो. बघा विचार करून.
मनातील शांतता हि भौगोलिक शांततेवर अवलंबून नसते असे माझे मत आहे. बघा विचार करून.
ज्या माणसाला आत्मविश्वास असतो, त्याला दुसऱ्याच्या सर्टिफिकेटची गरज लागत नाही.
आपल्याला आयुष्यात अनेक अनुभव येतात. काही चांगले, काही वाईट, काही आंबट – गोड, काही कडू वगैरे. हे अनुभव आपल्याला काहीतरी शिकवतात. त्यातून प्रत्येक जण नेमके किती शिकतो हा वैयक्तिक प्रश्न आहे आणि संशोधनाचा सुद्धा. असो.
लहानपणी आपण खेळण्यांनी खेळतो. काहीवेळा पालकांसाठी आपण खेळणे असतो. नियतीच्या हातात तर आपण सर्वजण खेळणीच असतो.