निवडणूक म्हणजे निवडणूक असते.
प्रत्येक क्षण म्हणजेच फक्त एक निवडणूक असते.
पण आपल्याला मात्र राजकीय निवडणूकच आठवते,
जी दर पाच वर्षांनी येते आणि प्रचाराचा, आरोप -प्रत्यारोपाचा
धुरळा उडवून देशातील वातावरण प्रदूषित करते.
आपण मात्र निवडणुकीच्या दिवसाला जोडून रजा घेता येईल का
ह्याचा विचार, मत कोणाला द्यायचे ह्या पेक्षा जास्त करतो. 🙂 😦
निवडणुकीतील मत म्हणजे पर्यायाची निवड —
कोण अधिक चांगला किंवा कोण कमी वाईट
किंवा ह्यावर्षी पासून कोणीच नाही (NOTA )
पण आयुष्यातील प्रत्येक क्षणाची निवडणूक करावीच लागते….
हि निवडणूक एव्हडी अंगवळणी पडली आहे कि
हि निवडणूक आहे हेच आपल्या ध्यानी येत नसते. 🙂
सकाळी लवकर उठायचे कि उशिरा, किती वाजता, हसत मुखाने उठायचे कि आळसाने, गजर लावायचा कि नाही, रिक्षाने जायचे कि Taxi ने, First क्लासने कि सेकंड क्लासने, लिफ्ट वापरायची कि जिना चढत जायचे, कोणते शिक्षण घ्यायचे, नोकरी करायची कि व्यवसाय, एकत्र राहायचे कि वेगळे, नोकरी करणाऱ्या मुलीशी लग्न करायचे कि बायकोला नोकरी नसली तरी चालेल, पाल्याला कोणत्या शाळेत घालायचे, कोणत्या माध्यमातून शिक्षण द्यायचे. हि जंत्री न संपणारी आहे……
आणि आपण मोकळे होतो मतदान करून.
सुधीर वैद्य
0 Responses to “३५२) पर्याय – एक चिंतन”